No menu items!
Thursday, September 19, 2024

विचार विनिमयाने,समन्वयाने हे काम मार्गी लावू- खासदार शेट्टर

Must read

बेळगांव तालुक्यातील पश्चिम भागात उगमस्थान असणारी मार्कंडेय नदी बारमाही वाहती आहे . पश्चिम भागातील शेत जमीन बारमाही ओलिताखाली ठेवून हरित क्रांती घडवून आणली आहे .शाश्वत विचाराने ‘तिलारी धरण महाराष्ट्र’ कालव्याने नदीला जोडण्यासंबंधीचा स्थानिक शेतकरी वर्गाचा तुडये-पंचायत सदस्य यांनी या संदर्भात खासदारांची भेट घेतली तसेच सिमालगत गावकर्यांना,स्थानिक प्रतिनिधींना सोबत घेवून प्रस्ताव सादर करून शेतकर्यांच्यावतीने पुढाकार घेऊन बेळगांव चे खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी चर्चा करण्यात आली .यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील विविध भागातील पंचायत सदस्य मंडळींनी चर्चा केली.

यावर खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले की, चंदगडचे स्थानिक आमदार श्री राजेश पाटील यांच्यासोबत तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार्यांसोबत बैठक घेऊन विचार विनिमयाने,समन्वयाने हे काम मार्गी लावू

यावेळी पुंडलिक मोरे, पुंडलिक पावशे, निंगाप्पा जाधव, किसन सुंठकर, सुरेश अगसगेकर, माजी नगरसेवक नगरसेवक अनिल पाटील,महांतेश कोळुचे, उमेश नाईक,ग्रामपंचायत सदस्य मारुती सुतार, वैजनाथ बेन्नाळकर आदी उपस्थित होते

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!