“पाणी अडवा पाणी जिरवा ” जल है तो कल है ” पाणी वाचवा जीवन वाचवा”
प्यास फाऊंडेशनने या वर्षीच्या तिसऱ्या प्रकल्पावर गजपती गावातील तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी काम सुरू केले आहे .हे गाव बेळगाव तालुक्यात बेळगावी शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर असून सुमारे 2600 लोकसंख्या असून सुमारे 500 गुरे आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या तलावाच्या खोलीत पाणी टिकत नाही आणि उन्हाळ्यात तलाव कोरडा पडतो प्यास फाउंडेशन तर्फे तलावाची खोली 6 फूट वाढवून 6.4 एकर असलेल्या तलावाचे पुनरुज्जीवन करणार आहे आणि तलावाच्या सभोवतालच्या पट्ट्या मजबूत करणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
या तलाव मध्ये संपूर्ण पावसाचे पाणी साठवून भूगर्भातील पाणी वाढवणे आणि आजूबाजूच्या विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
या तलाववाच्या कामासाठी श्री किरण जिनागौडा आणि श्री बालचंद्र बदन जे जिनाबाकुल फोर्जच्या माध्यमातून मदत करणार असून या प्रकल्पात सीएसआर भागीदार आहेत. तलावाच्या ठिकाणी पूजेच्या वेळी
प्यास चे – सचिव डॉ प्रीती कोरे, श्री अवधूत सामंत, श्री सतीश लाड, श्री रोहन, श्री लक्ष्मीकांत, श्री अभिमन्यू दागा, गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.