No menu items!
Thursday, August 28, 2025

आंबा महोत्सवाचे उदघाट्न जिल्हाधिकारांच्या हस्ते

Must read

बागायत खाते आणि जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील क्लब रोडजवळील ह्यूम पार्क येथे दिनांक २६ मे ते २९ मे या चार दिवसांचा आंबा मेळाव्याचे उदघाट्न करण्यात आले आहे .या आंबा महोत्सवाचे उदघाट्न जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले .

यावेळी ते म्हणाले की आंबा मेळाव्यातील आंबे हे शास्त्रोक्त पद्धतीने फळांची काढणी करून नैसर्गिक, पिकवणारी, कॅल्शियम आणि कार्बाइड मुक्त फळे स्वस्त दरात तयार करण्यात आली आहेत .त्यामुळे या आंबा महोत्सवात सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात प्रदर्शनातील आंबे विक्री करण्यात येणार आहेत.

बाजारात अनेक प्रकारचे आंबे विकले जातात. मात्र या आंबा महोत्सवात जिल्ह्यातील सर्व ग्राहक वाजवी दरात आंबा खरेदी करू शकतात आणि स्वादिष्ट आंब्याचा आस्वाद घेऊ शकतात .असे सांगितले

यावेळी आर्का मायक्रोबियल कन्सोर्टियम द्रव खत सादर केले गेले.त्यानंतर जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. वाही यांनी आंबा प्रदर्शनात बोलताना म्हणाले की, अशा मेळ्यांमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो. दर दोन महिन्यांनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या आंबा आणि विविध बागायती पिकांचा मेळा आयोजित करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जावे असे म्हणाले.

या आंब्याच्या प्रदर्शनात बेळगाव, खानापूर, धारवाड, कित्तुरा यासह विविध तालुक्यांतील आंब्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांनी पिकवलेल्या आंब्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही आंब्याची विक्री याप्रसंगी केली.

सदर प्रदर्शनात तोतापुरी, केसर, मालगोवा, दूधपाडा, कोकणी ,हापूस, रासपुरी, दाशेरी, बेनेशाना, सिंधुरी, मल्लिका, कोबरीकाई, कारी इशाडी, याकपुरी यासह शंभरहून अधिक जातीच्या आंब्याच्या घमघटाने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले .
यावेळी फलोत्पादन विभागाचे उपसंचालक महंतेश मुरागोडा, बेळगाव विभागाचे संचालक सोमशेखर हुलोलकी व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!