No menu items!
Tuesday, September 2, 2025

अनगोळ शिवारातील टिसी बदलल्याने शेतकऱ्यात समाधान

Must read

गेल्या आठ दिवसापूर्वी अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या शेतात बसवलेला पावसाळ्यात टिसी शॉर्ट होऊन बष्ट झाल्याने निकामी होता.या भागात आता भात लावणी करण्यासाठी पावसाची शाश्वती शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत गरज होती.म्हणून संबधीत मुख्य विद्युत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन ताबडतोब टिसी बदलून दिलासा द्यावा असे सांगितले होते.कारण शेतातील कोनतिही टिसी जळाल्यास 24 तासाच्या आत तो बदलून शेतकऱ्यांच नुकसान टाळावं हा सरकारचा नियम आहे.त्यासाठी सदर टिसी बसवण्यासाठी विद्यूत कर्मचारी कामाला लागले त्यासाठी आता शेतात भातपीकं असल्याने टिसी जाग्यापर्यंत नेण्यासाठी अडचण असल्याने शेतकऱ्यांनीच बैलगाडीतून येळ्ळूर रस्त्यावरुन बाळेकुंद्री यांच्या शेतापर्यंत नेऊन ठेवली.ती लवकरच सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विद्यूत अधिकारी,कर्मचारी कामाला लागल्याने शेतकऱ्यांना मोठे समाधान झाले आहे.
सदर टिसी बाळेकुंद्री यांच्या शेतातून येळ्ळूर रस्ताकडेला बसवल्यास सोईचे होत विद्यूत कर्मचाऱ्यांनाही संरक्षित होईल यासाठीही शेतकरी प्रयत्न करणार आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!