कलम ३७० रद्द केल्यानंतरही काश्मीरमध्ये
दहशतवाद्यांचा नंगानाच सुरूच आहे. या दहशतवादाला आळा घालण्यासाठी जम्मू – काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यात यावा व २७ हिंदू पर्यटकांची हत्या केलेल्या दहशतवाद्यांना कठोर शासन करून मृत्यूदंड देण्यात यावा यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानच्यावतीने चन्नमा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले .
काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करा -श्रीराम सेना हिंदूस्थानची मागणी
