No menu items!
Monday, September 1, 2025

ही रेल्वे सेवा सुरु केल्यास रेल्वेच्या महसूल मध्ये होईल वाढ -खा इराण्णा कडाडी

Must read

राज्यसभा खासदार इराणा कडाडी यांनी मंगळवारी संसदेच्या अधिवेशनात बेळगाव ते हैदराबाद आणि मुंबई रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली.
याप्रसंगी विशेष उल्लेख करून हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की , ‘बेळगाव हा ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून, शैक्षणिक, पर्यटन, व्यवसाय आणि औद्योगिक कारणांसाठी हजारो प्रवासी दररोज मुंबई आणि हैदराबादला जातात.

पण सध्या नागरिक महामार्गवरुन प्रवास करत आहेत त्यामध्ये त्यांचा बराच वेळ जात आहे तसेच सध्या बेळगावहून मुंबई, हैदराबाद शहरांसाठी थेट रेल्वे नाही आणि नागरीकांना सणासुदीच्या वेळी बसने प्रवास करण्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट भाडे मोजावे लागत आहे

त्यामुळे या शहरांदरम्यान दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेतून होत आहे.असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

पुढे ते म्हणाले की मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की, रेल्वे मंत्रालयाने यावर तात्काळ विचार करावा आणि बेळगाव मुंबई, हैदराबादसारख्या महत्त्वाच्या शहरांशी जोडण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करावी, ज्यामुळे रेल्वेचा महसूल वाढण्यासही मदत होईल असे सांगितले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!