No menu items!
Thursday, August 28, 2025

या समस्येकडे नागरिकांनी वेधले आमदारांचे लक्ष

Must read

रविवारी सकाळी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी फॉर्च्युन कॉलनी आणि वीरभद्र नगर भागात जाऊन पाहणी करून तेथील रहिवाशांच्या तक्रारी जाणून घेतल्या .यावेळी रहिवाशांनी आमदारांचे स्वागत केले आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा केली.

यावेळी त्यांनी पाणी साचणे, रस्त्यांचा विकास अशा विविध समस्यांवर आमदारांचे लक्ष वेधले .यावेळी असिफ सेठ यांनी रहिवाशांना आश्वासन दिले .ते म्हणाले विकासात्मक काम आणि इतर विविध प्रकल्पांवर चर्चा केली जात आहे आणि या दौऱ्यांचा मुख्य उद्देश स्थानिक अधिकार्यांकडून सामान्य माहिती घेण्याऐवजी प्रत्यक्ष वास्तव जाणून घेणे आणि लोकांच्या समस्यांचे निराकरण करणे हा आहे.

यावेळी त्यांच्यासोबत परिसरातील नगरसेवक व इतर अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!