जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे.
काल रात्री भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता पाकिस्तानी लष्कर अलर्टवर आहे. दरम्यान, आता पाकिस्तानी सैन्यावर बलुच बंडखोरांनी हल्ला केला आहे. यामुळे आता पाकिस्तानमधील अंतर्गत वाद आता वाढल्याचे समोर आले आहे. बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ७ सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
रिमोट बॉम्बच्या मदतीने पाकिस्थानच वाहन उडवलं-७ सैनिक ठार
