नुकत्याच पार पडलेल्या एसएसएलसी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जैन समाजातील हुषार विद्यार्थ्यांना जितोतर्फे आर्थिक मदत केली जाणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून तो फक्त बेळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपुरता मर्यादित आहे. दहावी उत्तीर्ण व आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थीच अर्ज करू शकतात. इच्छुकांनी ५ जूनपर्यंत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी ९८४५०१६७१७ किंवा ९०३५१८७४३२ यावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क करावा, असे कळविले आहे.
गुणवंत-आर्थिक मागास विद्यार्थ्यांना जितोतर्फे आवाहन
By Akshata Naik
Previous articleमध्यवर्ती महाराष्ट्रएकीकरण समितीच्यावतीने आवाहन