बेळगावातील जैतनमाळ खादरवाडी येथील शेतात विजेच्या धक्क्याने काल एका लाईनमनचा मृत्यू झाला. राहुल पाटील (वय ३२) हे येळ्ळूर गावचे रहिवासी असून त्यांनी अगदी अलीकडेच आपल्या मुलाचे बारसे केले होते.सकाळी अंदाजे ८ वाजता खादरवाडीजवळील जैतनमाळ भागातील शेतामध्ये विजेचे रीडिंग घेण्यासाठी राहुल पाटील गेले होते. तेथे रीडिंग घेत असताना विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा केलाराहुल पाटील यांनी फक्त १५ दिवसांपूर्वी आपल्या मुलाचे बारसे साजरे केले होते. राहुल हामेहनती आणि जबाबदार व्यक्ती होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गावभर शोकाचे वातावरण आहे.
विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू
By Akshata Naik

Previous article*अँपटेक इन्व्हेशन बेळगांव च्या दोन मुलींची एअरपोर्ट वर निवड
Next articleमनपा विरोधी गटनेते मुज्जमिल डोणी यांचा राजीनामा